← Back to Previous Page

रेल्वेची रंजक सफर

रेल्वेची रंजक सफर

“रेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या ह्रदयाशी कायमची जोडली गेली आहे. दळणवळणाबरोबरच माणसांच्या भावनिक-सांस्कृतिक विश्वाशीही रेल्वेनं नातं जोडलं आहे.. भारतीय रेल्वेनं जात-धर्म, लिंग भेद दूर करत गरीब-श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणूनही एकत्र जोडलं.


किंमत: ₹१००/-

सवलत किंमत: ₹८०/-


पाने: २०९

रेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या ह्रदयाशी कायमची जोडली गेली आहे. दळणवळणाबरोबरच माणसांच्या भावनिक-सांस्कृतिक विश्वाशीही रेल्वेनं नातं जोडलं आहे.. भारतीय रेल्वेनं जात-धर्म, लिंग भेद दूर करत गरीब-श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणूनही एकत्र जोडलं. वाफेच्या ईंजिनाच्या गाडीपासून वेगवान मेट्रो ते बुलेट ट्रेन असा जगभरातला रेल्वे उभारणीचा इतिहास जवळपास दोनशे वर्षांचा आहे. रेल्वेची निर्मिती, रेल्वेचे रुळ, उभे राहिलेले पूल, स्टेशन्स, प्लॅटफॉर्म बांधणी, डब्यांची बांधणी, अंतर्गत व्यवस्था आणि सोई-सुविधा ही सगळी वाटचाल थक्क करणारी आहे. हा प्रवास रेल्वेरुळांसारखा अफाट आहे. वेगवान गतीनं तो सरुच राहणार आहे.


रेल्वे प्रवासाच्या आवडीने झपाटलेल्या एका मुशाफिरानं अनुभवलेली आणि सांगितलेली ही रेल्वेची रोचक, रंजक अन् विस्मयकारक कहाणी.