मी अश्वत्थामा चिरंजीव – इ-पुस्तक
प्रख्यात नाटककार व ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक श्री. अशोक समेळ यांनी ‘मी अश्वत्थामा… चिरंजीव’ ही महाकादंबरी लिहिली आहे. श्रीमहर्षी व्यासांच्या महाभारतातील दुर्लक्षित व्यक्तिरेखेवर लिहिलेली ही बहुतेक मराठीतील पहिली कादंबरी असावी. महाभारतातील लोकप्रिय विभूतींवर बेतलेल्या अनेक कलाकृती आजमितीपर्यंत निर्माण झाल्या आहेत आणि भारतीय जनमानसाच्या कौतुकाला त्या पात्र ठरल्या आहेत. परंतू अश्वत्थाम्यासारख्या काहीशा अनुल्लेखनीय व दुर्लक्षित खलात्म्यावर मराठीतून करुणामय व वात्सल्यमय चित्रण करण्याचे धाडस अशोक समेळ यांनी दाखवले आहे.
सवलत किंमत: ₹300/-
प्रख्यात नाटककार व ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक श्री. अशोक समेळ यांनी ‘मी अश्वत्थामा… चिरंजीव’ ही महाकादंबरी लिहिली आहे. श्रीमहर्षी व्यासांच्या महाभारतातील दुर्लक्षित व्यक्तिरेखेवर लिहिलेली ही बहुतेक मराठीतील पहिली कादंबरी असावी. महाभारतातील लोकप्रिय विभूतींवर बेतलेल्या अनेक कलाकृती आजमितीपर्यंत निर्माण झाल्या आहेत आणि भारतीय जनमानसाच्या कौतुकाला त्या पात्र ठरल्या आहेत. परंतू अश्वत्थाम्यासारख्या काहीशा अनुल्लेखनीय व दुर्लक्षित खलात्म्यावर मराठीतून करुणामय व वात्सल्यमय चित्रण करण्याचे धाडस अशोक समेळ यांनी दाखवले आहे.
श्रीपरशुराम, श्रीहनुमान, बळीराजा, बिभीषण, महर्षी व्यास, कृपाचार्य व युगात्मा अश्वत्थामा हे सप्तचिरंजीव मानले जातात. परंतु अश्वत्थामाव्यतिरिक्त उरलेल्या सहा महापुरुषांचे चिरंजीवित्व हे त्यांना लाभलेले वरदान आहे. याउलट अश्वत्थाम्याचे चिरंजीवित्व हा त्याला मिळालेला दुर्धर शाप आहे, असे मानले जाते. अश्वत्थाम्याने केलेल्या कुटिल आचरणाचे फलित म्हणून, श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने अश्वत्थाम्याच्या कपाळाच्या उर्ध्वभागी असलेला जन्मजात नीलमणी उपटून काढल्यावर, ती भळभळती जखम घेऊन दारोदार तेल मागत फिरणारा भ्रष्ट योगी असा अश्वत्थाम्याचा लौकिक आहे! श्रीपरशुराम, श्रीहनुमान, बळीराजा, बिभीषण, महर्षी व्यास, कृपाचार्य व युगात्मा अश्वत्थामा हे सप्तचिरंजीव मानले जातात. परंतु अश्वत्थामाव्यतिरिक्त उरलेल्या सहा महापुरुषांचे चिरंजीवित्व हे त्यांना लाभलेले वरदान आहे. याउलट अश्वत्थाम्याचे चिरंजीवित्व हा त्याला मिळालेला दुर्धर शाप आहे, असे मानले जाते. अश्वत्थाम्याने केलेल्या कुटिल आचरणाचे फलित म्हणून, श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने अश्वत्थाम्याच्या कपाळाच्या उर्ध्वभागी असलेला जन्मजात नीलमणी उपटून काढल्यावर, ती भळभळती जखम घेऊन दारोदार तेल मागत फिरणारा भ्रष्ट योगी असा अश्वत्थाम्याचा लौकिक आहे!
लेखक : अशोक समेळ
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी